Tuesday, July 2, 2019

BJP MLA Ameet Satam present the issue of Skywalks of Mumbai Railway.

Ameet Satam recently launched his book 'Rokthok'. In the inaugural event, BJP MLA said that the reason behind releasing this book is to show that he is representing his people's issue in the legislative assembly of Maharashtra and how he is trying to resolve those issues. The book was launched by Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis in the presence of Ashish Shelar, Gajanan Kirtikar, and all the other respectable members.

द्वितीय पावसाळी अधिवेशन, नागपुर

विषय : मुंबईतील रेल्वेवरील उड्डाणपुलांची देखरेख, देखभाल व दुरुस्तीबाबत
लेखापरिक्षण

युटीलिटि कोरीडॉर लक्षवेधी सूचनेसंबंधी
(Utility Corridor)

श्री. अमीत साटम

अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने नियम १०५ अन्वये पुढील तातडीच्या व
सार्वजनिक महत्त्वाचा बाबींकडे सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधु इच्छितो आणि त्याबाबत
त्यांनी निवेदन करावे, अशी विनंती करतो.

“अंधेरी, मुंबई (प) येथील पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा गोखले पादचारी उडद्डाणपुल
अंधेरी रेल्वे स्थानकातील विलेपार्लेच्या बाजुच्या मार्गिकावर फलाटाच्या छतासह दिनांक ३
जुलै, २०१८ रोजी कोसळणे. काही भाग ओव्हरहेड वायरवर पडल्याने वीज पुरवठाही बंद
करण्यात येणे, या अपघातात पुलावरून जाणारे ५ जण जखमी झाले असुन त्यापैकी दोघांची
प्रकृती गंभीर असणे, या अपघातामुळे रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली असल्याने मुंबईकरांचे
झालेले प्रचंड हाल, परिणामी जनतेत निर्माण झालेली घबराट, मुंबई महानगरपालिका व
रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये या दुर्घटनेस जबाबदार कोण यावरुन वादविवाद होत असणे,
रेल्वे स्टेशन व रुळावरील उड्डाणपुल, पादचारी पुलांची दुरुस्ती करण्याचा अधिकार रेल्वे
प्रशासन महापालिकेला देत नसल्यामुळे मुंबई परिसरातील बहुसंख्य पुलांचे लेखापरिक्षण
होत नसल्याने अशा दुर्देवी घटना घडत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे असणे
भविष्यात अशा घटना घडत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे असणे, भविष्यात
अशा घटना घडु नये त्यासाठी मुंबईतील रेल्वेवरील अनेक उड्डाणपुल कोणाच्या देखरेखीखाली
आहेत व त्यांची देखभाल, दुरुस्ती कोण करणार याबाबत निर्णय घेऊन मुंबईतील सर्व पुलांचे
लेखापरिक्षण करुन जवाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता असणे, याबाबत शासनाने
करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) : अध्यक्ष महोदय, लक्षवेधी सुचने संबंधीच्या
निवेदनाच्या प्रती सन्माननीय सदस्यांना आधीच वितरित केल्या असल्यामुळे मी ते निवेदन
आपल्या अनुमतीने सभागृहाच्या पटलावर ठेवतो.

मा. मुख्यमंत्री महोदयांचे निवेदन

एस.व्ही.रोड, अंधेरी (पश्‍चिम), मुंबई येथील पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा रेल्वेवरील
गोपाळकृष्ण गोखले हा वाहतुक व पादचारी पुल रेल्वे प्रशासनामार्फत बांधण्यात आला होता.
सदर पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती दिनांक 0३-०७-२०१८ रोजी सकाळी ०७.५५
वा. मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झाली. तद्नंतर दुर्घटनास्थळी तात्काळ २
जलद प्रतिसाद वाहने (क्विक रिस्पॉन्स व्हेईकल) व १ फायर इंजिन रवाना करण्यात आले.

सदर पुलाच्या पूर्व व पश्‍चिम ब्राजु जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या दक्षिणेकडील पदपथाचा
भाग व सुमारे १० फुट रुंद, २०० फुट लांब आणि ५ फुट उंचीची भिंत रेल्वे रुळ क्रमांक
३ ते ९ तसेच रेल्वे फलाट क्रमांक ८ व ९ वरील जी.आय.शीटच्या छप्परावर कोसळल्याने
आढळुन आले.

सुरक्षिततेचा उपाय म्हणुन सदर पुलावरील वाहतुक पोलिसांच्या मदतीने बंद ठेवण्यात
आली होती. दुर्घटनास्थळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी ४ व्यक्तींची (१ महिला व ३ पुरुष) ढिगाऱ्यातुन
सुटका केली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १ व्यक्तीची
विविध उपकरणे व साहित्यांच्या सहाय्याने सुटका केली. जखमी व्यक्तींना उपचाराकरिता
विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी १ व्यक्‍तीचा दिनांक 0७-
0७-२०१८ रोजी मृत्यू झाला आहे.

रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील रेल्वे रुळावरील वाहतुक, पादचारी व पाईपलाईन अशा
सर्व प्रकारचे पूल रेल्वे प्रशासनाद्रारे बांधण्यात आले आहेत. अशा पुलांची बांधणी, दुरुस्ती
व देखभाल रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. तथापि रेल्वे अधिनियम १९८९ नुसार रेल्वे
प्रशासनाच्या मागणीनुसार पुलांची बांधणी, दुरुस्ती व देखभालाकरिता लागणारा खर्च बृहन्मुंबई
महानगरपालिकेमार्फत रेल्वे प्रशासनास वेळोवेळी अदा करण्यात येतो. गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या
दुरुस्ती व देखभाली करिता रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार लागणारा खर्च महानगरपालिकेमार्फत
वेळावेळी रेल्वे प्रशासनास अदा करण्यात आला असल्याचे ब्रृहन्मुंबई महानगरपालिकेने
कळविले आहे.

पुलांच्या सुरक्षिततेकरिता रेल्वे रुळावरील पुल वगळुन, ब्रृहन्मुंबई महानगरपालिकेच्या
अखत्यारीत असलेल्या ३०४ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम महानगरपालिकेमार्फत पुर्ण
करण्यात आले आहे. दुरुस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक असणाऱ्या पुलांच्या कामाकरिता
महानगरपालिकेमार्फत निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या पुलांबाबत दिनांक 0५-०७-२०१८ रोजी
मा. केंद्रीय रेल्वे मंत्री यांचे अध्यक्षतेखाली पश्‍चिम व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आयुक्‍त,
ग्रृहन्मुंबई महानगरपालिका यांची संयुक्‍त बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर
ब्रैठकीमध्ये मा. रेल्वे मंत्री यांचेमार्फत रेल्वे रुळावरील पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्याच्या
सुचना रेल्वे प्रशासनास देण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे रुळावरील पुलाचे सेफ्टी ऑडिट व
उपाययोजना तयार करण्याकरिता रेल्वे प्रशासनामार्फत आय.आय.टी., मुंबई यांच्या सहाय्याने
आवश्यक पथके निर्माण करण्यात येत आहेत.

श्री. अमीत साटम : अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत.
या विषयामध्ये चौकशी समिती नेमलेली आहे आणि आय.आय.टी., मुंबई मार्फत याची
चौकशी होणारच आहे. परंतु त्या दिवशी त्या पुलाकडे प्रथमदर्शनी बघुन असे वाटते की,
ज्या भागावरुन गाड्या जातात किंवा व्हेईक्‍युलर मुव्हमेंट असते तो भाग इनटॅक्ट होता आणि
जो फुटपाथचा भाग होता तो खाली पडलेला होता. तो भाग कोसळल्यानंतर त्या दोन्ही
फुटपाथच्या भागावरुन किमान २५ ते ३० युटीलिटीच्या केबलं त्यातुन लटकताना दिसत
होत्या. त्यामुळे त्यात एम.टी.एन.एल.ची केबल, पाण्याची लाईन किंवा फोर जीची केबल अशा
अनेक प्रकारच्या युटीलीटीच्या केबल त्यातून लटकताना दिसत होत्या. या अनुषंगाने मला
असे वाटते की तो फ्लायओव्हर ब्रिज, व्हेईक्‍युलर ट्राफिकचा ब्रिज, फुटओव्हर ब्रिज, फुटपाथ
किंवा मुंबई शहरातील रस्ते असतील तरी कोणत्याची रस्त्यावर किंवा फ्लाय ओव्हरवर मोठ्या
प्रमाणावर युटिलिटिसाठी रस्त्याचा एकच भाग अनेकवेळा खोदुन त्याचे रिइनस्टेटमेन्ट बरोबर
होत नाहि. त्यामुळे वर्षानुवर्ष खोदून खोदून तो विक्री झाला होता. आता हे सर्व कशामुळे
झाले होते हे आय.आय.टी. मुंबईच्या अहवालामध्ये ते स्पष्ट होईल. रेल्वे विभागाच्या एका
अधिकाऱ्याने असे स्टेटमेंट सुद्धा केलेले आहे की, कदाचित The load of the
utility caused this particular collapse. त्यामुळे माझे
दोन स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की अनेकवेळा रस्ते खोदुन युटिलीटी ले करण्यासाठी तो रस्ता
कितीही चांगला बनवला तरी खराब होतोच.
त्यामुळे अशा प्रकारे युटिलीटी ले करण्यासाठी मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेला युटिलीटी
कॉरीडोअर करण्यासाठी आदेश देणार काय? हा माझा पहिला प्रश्न आहे म्हणजे जेणेकरुन
एकच रस्ता अनेक वेळेला युटिलीटीसाठी मोजला खोदला जाऊ नये.

अध्यक्ष महोदय, माझा दुसरा प्रश्न असा आहे की, मुंबई महानगरपालिका जेव्हा मुंबई
शहरातील रस्त्याचे कंत्राट देते त्यामध्ये एका-एका रस्त्याचे वेगवेगळे टेंडर स्टॅडींग समितीमध्ये
येते. त्यामुळे एका रस्त्याचे टेंडर हे २ कोटी रुपये, ३ कोटी रुपये किंवा ४ कोटी रुपये
असल्यामुळे छोट्या छोट्या कंत्राटदारांची तिथे एक रिंग तयार केलेली आहे. हे कंत्राटदार ते
बिल्ड करतात आणि क्वालिटीनुसार ते काम करीत नाहीत त्यामुळे मुंबई शहराच्या रस्त्याची
दुरवस्था झालेली आहे. माझा प्रश्न आहे की वेस्टर्न सबर्न्स, इस्टर्न सबर्ब्स आणि सिटी असे
तीन वेगळे मोठे टेंडर करुन मोठ्या नामांकित राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय इन्फ्रास्ट्रकचर
कंपनीला मुंबई शहराचे रस्ते करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला तशा प्रकारचे आदेश देणार
काय?

श्री. देवेंद्र फडणवीस : अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी युटिलिटी कॉरीडोअर
करण्याच्या संदर्भात जो पहिला मुद्दा मांडला तो चांगला आहे. ज्या ठिकाणी शक्‍य असेल किंवा
नवीन काम असेल तिथे याचा विचार करावा याच्या सुचना महानगरपालिकेला देण्यात येतील.
त्यांनी जो दुसरा मुद्दा मांडले आहे त्या संदर्भात तशा प्रकारच्या सूचना शासन स्तरावरुन
देणे योग्य होणार नाही. टेंडर कसे काढले पाहिजे या संदर्भातील मॅन्युअल शासन स्तरावरुन
महानगरपालिकेला दिलेले आहे. त्यानुसार महानगरपालिकेने काम केले पाहिजे. त्यामुळे मला

वाटते की अशा प्रकारच्या सुचना या स्तरावरुन देणे योग्य होणार नाही.

No comments:

Post a Comment